फार्म मॅनेजमेंट (शेतीचे व्यवसथापन)

 https://youtube.com/shorts/JIo6K_1U7vg?si=Tg0oP6GsojonRBVd



*मायक्रो मॅनेजमेंट*

*शेतातल्या घराचे*

*रोजच्या जगण्याचे*


आत्मनिर्भर देश..

आत्मनिर्भर शेतकरी..

आत्मनिर्भर समाज..


सधन भारत..

संपन्न भारत.. 

संपूर्ण भारत..


मेरा गाव मेरा देश..

समृध्द भारत..

आत्मनिर्भर भारत..

मेक इन इंडिया..

स्वदेशी..

नो इम्पोर्ट..

ओन्ली एक्सपोर्ट..

घर घर में किसान..

घर घर में अनाज..

सबका साथ सबका विकास..


हायवेच्या कडेला शेतातल घर..

घराच्या मागे शेत..

शेतात विहीर..

विहरिवर मोटर..

घरावर पाणी साठवून ठेवण्याची मोठी टाकी..

शेतात ठिबक सिंचन..

घरासमोर चार चाकी..

घरावर पवन चक्की..

घरावर सोलर पॅनल..

घरात दोन म्हसी..

एक छोट ट्रॅक्टर..

घरातच गोबर गॅस..

शेतात छोट्या छोट्या तुकड्यात 1000 प्रकारचे उत्पन्न देणारी वेगवेगळी झाडे..

• फळ झाडे 100 प्रकारची

• 100 प्रकारची धान्य

• 100 प्रकारची मसाल्याची पिके

• ऊस

• सुका मेव्याची 2-2 झाडे

• संत्री, मोसंबी, केळी, पेरू, सीताफळ, रामफळ अशी वेगवेगळी फळझाडे 50 फळ झाडे

• घरघंटी..पिठाची छोटी चक्की 

• एक उसाचा रस काढणारी अगदी छोटी मशीन


एवढ सगळ गावातील प्रत्येक शेतकऱ्याने केल तर शेतकऱ्याला शेताच्या बाहेर कुठेही काहीही आणायला जावे लागणार नाही.. शेतकऱ्याचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे दुसऱ्यावर अवलंबून राहणेच संपुष्टात येईल..

गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबात असे स्व स्वावलंबत्वाचे बदल घडले तर देश हा आत्मनिर्भर होणारच..नाही का..!!


शेतात आणि शेतातल्या घरातच सगळ काही मिळेल..


घर मिळाल..

अन्न मिळाल..

सोलर ऊर्जा मिळाली..

पवन ऊर्जा मिळाली..

गोबर गॅस मिळाला..

दूध, दही, उसाचा रस(साखर) मिळाली, अन्न मिळाले, मसाले मिळाले, फळे मिळाली, भाज्या मिळाल्या, दूध मिळाले, पिण्यासाठी आणि शेतासाठी पाणी मिळाल, सुका मेवा खायला मिळाला, आणि घरात एखादा आयुर्वेदिक किंवा अलोप्याथीक डॉक्टर असला तर घरातल्या 90 ते 95 टक्के गरजा घरातच पूर्ण होतात..उरलेल्या 10% गरजासाठी फक्त बाजारावर अवलंबून राहावं लागणे म्हणजे तो आपल्या कुटुंबासाठी फिरण्यातला आनंद किंवा टूरवर फिरायला गेलो म्हणून समजायचे..प्रत्येक शेतकऱ्याने त्यांचे शेतात अश्या सुविधा निर्माण केल्यातर ते शेतकरी कुटुंब 100% आत्मनिर्भर झाले असे समजावे..


यालाच तर म्हणतात आत्मनिर्भर देश, आत्मनिर्भर शेतकरी, आत्मनिर्भर समाज..ज्या देशात 70% शेतकरी राहतात, जो देश शेतीप्रधान आहे त्या देशासाठी यापेक्षा वेगळी आत्मनिर्भरता असूच शकत नाही..सरकारनी आणि शेतकऱ्यांनी हे समजून घेतले तरच " संपूर्ण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न शक्य होईल नाही का..!!


https://youtube.com/shorts/JIo6K_1U7vg?si=Tg0oP6GsojonRBVd

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..