*ज्ञानाच संकलन,संचयन आणि नियमन* ज्ञान देणारे गुगल असू दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, चॅट जिपीटी असू दे किंवा डीपसिक असू दे..ज्ञान हे कधीही पूर्ण पने मिळणार नाही...एकच माणूस सगळ्या विषयात ज्ञानी असूच शकत नाही..ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया निरंतर, अखंडित स्वरूपाची आणि निर्भेळ असायला हवी..पण तशी ती कायम राहत नाही..असे का होते..याचा विचार केल्यास असे लक्ष्यात येते..की अभ्यासाचे विषय अनेक, शिकवणारे अनेक, सगळ्या विषयाच्या ज्ञानाच एकत्रित संकलन अशक्य..आणि ज्ञानात झालेली भेसळ हा तर संशोधनाचा विषय..त्यामुळे आपल्याजवळ जे आणि जेवढे ज्ञान आहे त्यातच जीवनाचे समाधान शोधा..*ज्ञानाचा अती शोध आणि ज्ञानाचे अती संकलन हे माणसाला मानसिक रोगी बनवण्याची क्षमता ठेऊन असते.. हे माणसाला वेळीच लक्ष्यात येणे गरजेचे असते..* नाही का..!!
२७ लाख वर्षांपूर्वी पाषाण युगात मानवांनी सर्वप्रथम "दगडा" पासून "शस्त्र" बनवली तीच दगडापासून बनवलेली शस्त्रे मग मानवासाठी "देव" बनून देवसारखी कामे करू लागली..."पाषाण युगाचे" (स्टोन एज) चे काळात माणसाचे आयुष्य याच दगडाच्या शस्त्रामुळे जरा सुखकर झाल... विचार तर करून बघा "पाषाण युगाच्या " (स्टोन एज) २७ लाख वर्षा पूर्वीच्या त्या पुरातन काळात शस्त्राशिवाय आपले पूर्वज कसे जगले असतील... पुुर्वजांचे दगडा शिवायचे आयुष्य किती कष्टदायक असेल... जंगली श्वापदांचा सततचा धोका मनुष्यास सारखा त्रास देत असावा... जीवन मरणाचे प्रसंग तर नेहमीचेच...पण याच काळात माणसाने दगडा पासून शस्त्रे बनवण्याची कला जेव्हा अवगत केली...तेव्हा पासूनच मानसाला "दगडात लपलेला कर्म नावाचा देव" दिसला...दगडात सुद्धा कर्म लपलेल असत याचा शोध मानवास लागला.... दगडाच्या आत असलेले अस्त्र आणि शस्त्रा शिवायचे जगणे हे नरकापेक्षाही वाईट आहे...हे जेव्हा माणसाला स्पष्ट पणे समजले तेव्हा पासून मानवाने "दगडाची पूजा" सुरू केली ती आ...
Comments
Post a Comment